परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ३००० अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती; राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी दिशा
मुंबई | लोकमदत न्यूज
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून एसटी महामंडळाला मोठी ताकद मिळाली आहे. राज्यभरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या ३००० अत्याधुनिक बसेसचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्यातील अनेक मान्यवर मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन बसेस आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. आरामदायी आसनव्यवस्था, सुधारित सस्पेन्शन प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा आणि डिजिटल सुविधांमुळे प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण ते शहरी भागांमधील दळणवळण अधिक मजबूत होणार असून एसटी सेवेला नवसंजीवनी मिळणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, “एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून ती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनरेखा आहे. या बसेसमुळे प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सेवा देण्याच्या दिशेने आम्ही एक मोठे पाऊल उचलले आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, एसटीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासोबतच सेवा अधिक प्रवासी-केंद्रित करण्यावर शासनाचा भर असून भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून एसटी सेवेचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळ नव्या युगात प्रवेश करत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786















