चार्जशीट वेळेत दाखल न केल्याने तुळजापूरचे एपीआय सुरेश नरवडे निलंबित, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची कठोर कारवाई
धाराशिव दि. १० (प्रतिनिधी) :पोलीस विभागातील शिस्त आणि जबाबदारीला सर्वोच्च स्थान देत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी कठोर कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कचरु नरवडे (पोलीस ठाणे तुळजापूर) यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
पोलीस ठाणे तुळजापूर येथे दाखल गुरनं. 93/2025, कलम 103(1), 3(5) भा.न्या.सं. या गंभीर गुन्ह्याच्या तपासात नरवडे यांनी निष्काळजीपणा दाखवला. निर्धारित 90 दिवसांच्या कालावधीत चार्जशीट सादर करण्यात ते अपयशी राहिले, ज्यामुळे प्रकरण धोक्यात आले. या निष्काळजीपणाला गंभीर बाब मानून त्यांच्या कर्तव्यपालनामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस अधीक्षक रितू खोखर म्हणाले की,“पोलीस दलात शिस्त व जबाबदारी हा सर्वोच्च निकष आहे. कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणाला किंवा दुर्लक्षाला कधीही सहन केले जाणार नाही. जबाबदारी न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.”
या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून, भविष्यातील तपासकामी अधिकाऱ्यांसाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












