• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्री सरनाईकांचे स्पष्ट निर्देश

शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांची पूर्ण नोंदणी अनिवार्य

lokmadat news by lokmadat news
August 16, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
15
VIEWS

धाराशिव, दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला ठोस निर्देश देत शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक भूमिका घेतली.”शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही पुढील व्यवहार करण्यात येऊ नये,” असे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आजच्या या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, गेल्या काही काळात पवनचक्की प्रकल्पासाठी जमिनीचे व्यवहार करताना शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे, करारपत्रांमध्ये त्रुटी ठेवणे किंवा अटी अस्पष्ट ठेवणे अशा अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या.यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून,त्यांना आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की,”शेतकरी हा या व्यवहारातील मुख्य घटक आहे.त्याला फसवले जाऊ नये याची हमी प्रशासनाने घ्यावी.पवनचक्की कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय राखणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे.”

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली यासाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.ही समिती शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी,नोंदणी प्रक्रिया तसेच पवनचक्की कंपन्याकडून होणाऱ्या पुढील व्यवहारांचे नियमन करेल.कोणताही करार पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सर्व हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत,अशी अट घालण्यात आली आहे.

पालकमंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की,जिल्ह्यातील विकासकामांसाठी गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे,मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे हक्क गमावले जाऊ नयेत.पवनचक्की प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती आणि वीज उत्पादनाला चालना मिळणार असली,तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे.



बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली.काहींनी सांगितले की,त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही,तर काहींनी करारातील अटींचे स्पष्टीकरण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.या सर्व तक्रारी गांभीर्याने घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.



शेतकऱ्यांमध्ये यामुळे दिलासा निर्माण झाला आहे.पवनचक्की कंपनीसाठीही स्पष्ट नियम आखल्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि पुढील काळात वाद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या समितीमुळे दोन्ही बाजूंचा विश्वास वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



पवनचक्की प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या हितसुरक्षेसाठी सरकारने कडक भूमिका घेतली आहे.कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यवहार होणार नाही, हा पालकमंत्री सरनाईक यांचा संदेश शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

Tags: crimedharashiwosmanabadpolicesolartuljapurआढावा बैठकआंदोलनआमदारआमरण उपोषणउस्मानाबादओमराजेकैलास पाटीलखासदारग्रामसभाजिल्हाधिकारी कार्यालयपवनचक्कीपालकमंत्री प्रताप सरनाईक
SendShareTweet
Previous Post

शिवसेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी खा ओमराजेंची यांची केली बोलतीच बंद

Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

महाराष्ट्र

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

January 12, 2026
महाराष्ट्र

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

January 12, 2026
महाराष्ट्र

अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी विनामूल्य शासकीय जागा शासन आदेश जारी, पाठपुराव्याला यश : आमदार राणाजगजितसिंह पाटील

January 10, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा
५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

January 9, 2026
महाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‘वॉक ऑन राईट’चे मार्गदर्शन

January 9, 2026
महाराष्ट्र

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकार दिन साजरा

January 7, 2026
Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

January 16, 2026

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

January 15, 2026

अंबेहोळमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का विद्यमान उपसरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

January 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT