उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय उलथापालथ!…एवढ्या उमेदवारांची माघारी! पक्षांत मनधरणी यशस्वी तर काही ठिकाणी बंडखोरी कायम!
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर झाल्यापासून शहरातील राजकीय वातावरण तापलेले दिसत होते. इच्छुकांना उमेदवारी जाहीर करण्यास पक्षांनी उशीर लावल्यामुळे आणि काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याने नाराजी उफाळून आली होती. परिणामी नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून पक्षांपुढे संकट निर्माण केले होते.
अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध पक्षांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मनधरणी सुरू केली. काही प्रभागांमध्ये नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणला, तर काही ठिकाणी आश्वासने देत परिस्थिती सौम्य करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनाच माघार घ्यावी लागल्याने अपक्षांना वरचष्मा मिळाल्याची चर्चा शहरात रंगली.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी कालावधी संपताच तब्बल ५० ते ६० उमेदवारांनी माघार घेतल्याची नोंद झाली असल्याचे समजले. त्यामुळे अनेक प्रभागांतील लढत आता अधिक चुरशीची आणि रोचक होणार असल्याचे दिसून येत आहे. माघारीमुळे काही पक्षांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात बंडखोरीचे सावट अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.
निवडणूक घडामोडींवर वेळोवेळी अचूक माहिती आणि विश्लेषण देत असल्याने “लोकमदत” न्यूजचे रिपोर्टिंग सध्या धाराशिवच्या राजकीय क्षेत्रात विशेष चर्चेत आहे. कोणत्या उमेदवारांनी माघार घेतली आणि कोण रिंगणात कायम राहणार याबाबतची तपशिलवार माहिती थोड्याच वेळात “लोकमदत” न्यूजवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिणामी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये पुढील अपडेटची उत्सुकता वाढली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












