• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आ.कैलास पाटलांची मागणी

lokmadat news by lokmadat news
August 18, 2025
in कृषी
0
0
SHARES
7
VIEWS

जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव ता. 18: जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी म्हटले की, जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्याने पेरणी क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत.
धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण मंडळात 68.8 मिमी, ढोकी मंडळात 168.5 मिमी, जागजी मंडळात 66.3 मिमी, तेर मंडळात 168.5 मिमी, कळंब तालुक्यातील कळंब मंडळात 164.5 मिमी, इटकुर मंडळात 164.5 मिमी, येरमाळा मंडळात 82.3 मिमी, मोहा मंडळात 123.8. मिमी, शिरोढोण मंडळात 117.0 मिमी, गोविंदपूर मंडळात 168.5 मिमी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मंडळात 66.0 मिमी भूम तालुक्यातील ईट मंडळात 77.8 मिमी, वाशी तालुक्यातील वाशी मंडळात 145.3 मिमी, पारगाव मंडळात 91.0 मिमी, तेरखेडा मंडळात 82.3 मिमी या महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कळंब तालुक्यातील सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने सरासरी 136.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.सोयाबीन पिकावर मुळकुज,मानकुज व शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे सर्व पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे नदीच्या पात्राबाहेर पाणी पडल्याने नदीने वेगळेच पात्र धारण केले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. त्याचेही पंचनामे होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली आहेत. अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली असून तेथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याची स्थिती आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असतानाही नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक होते परंतु अद्यापपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. शेतकरी मदतीपासुन वंचित राहण्याची शक्यता असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासुन वंचित राहू नये तर याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी, सततच्या व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करण्याबाबत तात्काळ योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Tags: अतिवृष्टीआपत्तीग्रस्त शेतकरीआमदार कैलास पाटीलउस्मानाबादओला दुष्काळकृषीकृषी महाविद्यालयकृषीमंत्रीजिल्हाधिकारीदत्तात्रय भरणे कृषिमंत्रीधाराशिव
SendShareTweet
Previous Post

“आम्हाला DJ नको” म्हणत लहान मुलांनी शिराढोण करांना घातली भावनिक साद

Next Post

शहरातील पत्त्याच्या क्लबवर अप्पर पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची मोठी कारवाई  – प्रतिष्ठित नागरिकांसह अनेक जुगारी अटकेत.!

Related Posts

कृषी

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

February 26, 2026
कृषी

तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

February 24, 2026
कृषी

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

February 12, 2026
कृषी

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

January 11, 2026
कृषी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

January 2, 2026
कृषी

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

November 19, 2025
Next Post

शहरातील पत्त्याच्या क्लबवर अप्पर पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची मोठी कारवाई  – प्रतिष्ठित नागरिकांसह अनेक जुगारी अटकेत.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT