धाराशिवमध्ये महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मल्हार पाटील यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट
जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि सक्षम नेतृत्वामुळे महायुतीचा झेंडा जिल्हाभर फडकला — विकासाला नवी दिशा मिळणार
लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुंबई येथे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान धाराशिव जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल चर्चा झाली. हे यश जनतेच्या विश्वासातून, कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीतून आणि सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आगामी काळात महायुतीची एकजूट अधिक मजबूत करून विकासाभिमुख राजकारणाचा वेग वाढवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध होत असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे मल्हार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकल्याने आता विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या यशामुळे धाराशिव जिल्ह्यात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, जनतेच्या विश्वासास पात्र ठरत महायुती भविष्यातही लोकहिताचे निर्णय घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













