गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा दत्ता पेठे यांच्या वतीने सत्कार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुरस्कारप्राप्त कादंबरी व लेखणी देऊन सन्मान विकासासाठी काम करण्याचा पाटील यांचा निर्धार
धाराशिव | लोकमदत न्यूज
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर धाराशिव जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त कादंबरीसह लेखणी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा सत्कार दत्ता (तात्या) पेठे यांच्या हस्ते पार पडला. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर अर्चनाताई पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी सर्वांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, सदर कादंबरी वाचण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून होती, मात्र वेळेअभावी ते शक्य झाले नव्हते. “आज सत्काराच्या निमित्ताने मिळालेली ही कादंबरी माझ्यासाठी विशेष स्मरणीय राहील आणि मी ती पूर्ण वाचणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच सत्कारावेळी देण्यात आलेल्या लेखणीबाबतही त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “ही लेखणी केवळ सन्मानाचे प्रतीक नसून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासासाठी निर्णय घेण्याची प्रेरणा आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना याच लेखणीने काम करत राहीन आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या सत्कार सोहळा प्रसंगी मेसा जानराव, शिवाजी क्षिरसागर, सुमेध क्षिरसागर, संतोष पेठे, शंकर मोरे, नेताजी क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












