बेंबळी दि.31(प्रतिनिधी):निर्मला शांतीकुमार कटके (६५) यांचे दीर्घ आजाराने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बेंबळी, ताजी धाराशिव येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंड, दोन विवाहित मुली, असा परिवार आहे. धाराशिव येथील दिव्य मराठीचे पत्रकार ॲड. उपेंद्र शांतीकुमार कटके यांच्या त्या मातोश्री होत.











