तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):तेर गावात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या दरबारात तेरसह आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
जनता दरबारात घरकुल योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी, निराधार व अपंग व्यक्तींना मानधन, गावातील रस्ते व शेतरस्ते दुरुस्ती, किसान सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या विषयांवर नागरिकांनी मांडणी केली. पाटील यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देत नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या की, “जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्या मार्गी लावणे हीच खरी लोकसेवा आहे. योजनांचा लाभ कुठल्याही परिस्थितीत नागरिकांपासून वंचित राहता कामा नये.”
या कार्यक्रमाला माजी सभापती दत्ता देवळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा प्रीती कदम, उषाताई यरकळ, सिमा वाकुरे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख, कृषी सहाय्यक राम शिंदे, ग्राम अधिकारी लाडे यांच्यासह भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी, बालाजी पांढरे, जूनेद मोमीन, मंगेश फंड, सुमेध वाघमारे, सुभाष कुलकर्णी, अमोल कस्तुरे, तानाजी बंडे, इर्शाद मुलाणी, गणेश फंड, बिभीषण लोमटे, अर्शद मुलाणी, सोमनाथ माळी, विशाल गोरे, विवेकानंद नाईकवाडी, नवनाथ पसारे, अजीत कदम, प्रतीक नाईकवाडी, प्रवीण साळुंखे, राम कोळी, अभिमान रसाळ, किशोर काळे आदींसह शेकडो नागरिक व महिला सहभागी झाले.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












