अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !
श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?
‘कानफुक्या रिल्स स्टार’ फुशारकी मारण्यातच गुंग !
धाराशिव / लोकमदत न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धाराशिवचे जावई स्व अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तर राज्य सरकारने तीन दिवसाचा दुखवटा पाळला. तसेच अनेक नगर परिषद आणि ग्रामपंचायतने देखील त्यांना श्रद्धांजली वाहणारे ठराव पारित केले. मात्र, धाराशिवचे जावई असलेल्या अजितदादांना खुद्द सासरवाडीतील धाराशिव नगर परिषदेने पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहने व तसा ठराव घेणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे नगर परिषदेची सत्ता देखील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. त्यातच ‘कानफुक्या रील्स स्टार’ म्हणून नव्यानेच धाराशिव शहरामध्ये चर्चेत असलेल्या…
त्या सभापतीने देखील बाकीच्या बिनकाम्या उचापती करण्याऐवजी या विषयाला प्राधान्य दिले असते तर त्याच्या हातून चांगले काम झाले असते, अशी चर्चा रंगू लागली आहे.
धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची पहिली सभा दि.१३ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत मागील इतिवृत्तास मंजुरी देण्यासह इतर विविध विषय घेऊन त्यास मंजुरी दिली. मात्र, धाराशिवचे जावई आणि सासुरवाडीच्या ताब्यात सत्ता असलेल्या कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेमध्ये सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांच्यासह कानफुक्या रील स्टार सभापती व नगरसेवक यांना अजितदादांच्या श्रद्धांजली अर्पण करून तसा ठराव घेण्याचा विसर पडला की जाणीवपूर्वक विसर पाडला गेला ? कारण अजितदादांचे विमान अपघातामध्ये दि. २८ जानेवारी रोजी दुर्दैवी दुःखद निधन झाले. ही वार्ता समजताच अजितदादांचे जवळचे नातेवाईक आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह इतरांनी तात्काळ बारामतीकडे धाव घेतली. तर राज्य सरकारने देखील तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला. तसेच संसदेने देखील श्रद्धांजली अर्पण केली. तर राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा व गाव स्तरावर ग्रामपंचायत मध्ये देखील श्रद्धांजली सभा घेऊन तसा ठराव पारित केले. धाराशिव नगर परिषदेमध्ये देखील श्रद्धांजली वाहून ठराव घेणे अपेक्षित व क्रमप्राप्त होते. मात्र, सतत राजकारण डोळ्यासमोर ठेवणाऱ्या व राजकारणाच्या नशेत नगर परिषदेच्या सत्ताधारी मंडळींनी विशेषतः ‘कानफुक्या रील्स स्टार’ला अवांतर विषय आणून त्यावर चर्चा घडवली. मात्र, धाराशिवच्या जावयास श्रद्धांजली वाहण्याचा विषय त्याच्यात तोंडून निघाला नसल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











