• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

lokmadat news by lokmadat news
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
11
VIEWS

पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव दि १. (प्रतिनिधी) जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.जीवित व वित्तहानी देखील झाली असून ८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.अनेक पाळीव जनावरांचे देखील प्राण गेले आहे. पूरबाधित गावातील कोणताही शेतकरी व नागरिक हा मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन काळजीपूर्वक व पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप सिंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

     पुजार म्हणाले की,अनेकांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी पूर परिस्थिती बघितली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने तीन दिवस काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या ३१४९ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे. तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून झालेल्या नुकसानीची सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येत आहे.त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे,याची माहिती मिळणार आहे. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहे.५ ऑक्टोबरपर्यंत हे पंचनामे पूर्ण करण्यात येतील.जुलै ते ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी १८९ कोटी रुपये रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे.संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पुजार यांनी यावेळी दिली.

अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात उद्भवल्यास कमीत कमी नुकसान कसे होईल नुकसान होईल,यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील असे सांगून पुजार म्हणाले की,पूरपरिस्थिती कमी झाली असून पुरांचे पाणी ओसरत आहे. ग्रामीण भागातील अनेक पुलांची उंची कमी असल्यामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडली.या पुलांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध कंपन्या व बँकांच्या सीएसआर निधीतून मदत करण्यात येईल. त्यांना पूरग्रस्त गावांना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्यासाठी सीएसआर कॉन्फरन्स लवकरच घेण्यात येईल.पूर ओसरला असला तरी पूरबधित गावांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी रोगराई प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.सेवाभावी संस्थांनी पुरबधित गावांमध्ये परस्पर जाऊन मदत वाटप न करता तालुका प्रशासनाच्या समन्वयातून मदत वाटप करावी.पाळीव जनावरांसाठी मुरघासचा पुरवठा करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांसाठी मोफत चाऱ्याचा पुरवठा करणार असल्याची माहिती पुजार यांनी यावेळी दिली.

          जिल्ह्यातील ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असल्याचे सांगून पुजार म्हणाले की,नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. गावपातळीवर यंत्रणा समन्वयातून काम करत आहे.जिल्ह्यातील पूरग्रस्त सर्व गावांशी संपर्क झाला आहे.यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी बाधित गावात पोहोचून काम करत आहे.शेतकऱ्यांनी या कठीण परिस्थितीत निराश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये.शासन व प्रशासन भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून सामाजिक व आर्थिक नुकसानीची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे सांगून पुजार म्हणाले की, वेगवेगळ्या सेवाभावी संस्था,बँका व दानशूर व्यक्ती पूरग्रस्त भागासाठी मदत करत आहे. असे ते म्हणाले.

डॉ.घोष म्हणाले की,गावांमध्ये आरोग्य विभागाकडून रोगराई प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. पूरग्रस्तांची दैनंदिन आरोग्य पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रत्येक गावात २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.पाण्याचे किती स्त्रोत दूषित झाले आहे,हे तपासून उपाययोजना करण्यात येतील.ज्या पाणीपुरवठा योजना दूषित झाल्या आहे,त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येतील.ज्या शाळांचा शालेय पोषण आहार पाण्यामुळे संपूर्णता भिजला आहे, त्या शाळेला शेजारच्या शाळेतून पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी किती निधी लागणार आहे, याची माहिती घेऊन त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येणार असल्याचे डॉ.घोष यांनी यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Tags: atiwrushthi madatdharashiv collectordharashiv lokmadat newsअतिवृष्टीअनुदानआमदार कैलास पाटीलकर्जमाफीखासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवढगफुटीधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
SendShareTweet
Previous Post

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५….तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

महाराष्ट्र

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

January 12, 2026
महाराष्ट्र

दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

January 12, 2026
महाराष्ट्र

अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी विनामूल्य शासकीय जागा शासन आदेश जारी, पाठपुराव्याला यश : आमदार राणाजगजितसिंह पाटील

January 10, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा गतीदायक पाठपुरावा
५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

January 9, 2026
महाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‘वॉक ऑन राईट’चे मार्गदर्शन

January 9, 2026
महाराष्ट्र

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पत्रकार दिन साजरा

January 7, 2026
Next Post

शारदीय नवरात्र महोत्सव - २०२५....तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

January 16, 2026

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

January 15, 2026

अंबेहोळमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का विद्यमान उपसरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

January 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT