बदली आदेश असूनही जुन्या ठिकाणी बसलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचा निर्देश..! जिल्हा पोलीस दलात खळबळ
धाराशिव,दि.२४(अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलात प्रलंबित बदली आदेशांवर अखेर निर्णायक कारवाई सुरू झाली आहे. लोकमदत न्यूजने कर्मचाऱ्यांना बदली असूनही जुन्याच ठिकाणी थांबवण्यात आल्याचा मुद्दा मांडताच प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना “२४ तासांच्या आत बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर व्हा” असा आदेश जारी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून जिल्हा पोलीस यंत्रणेत यामुळे चांगलीच हालचाल सुरू झाली आहे.
३० मे २०२५: तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी बदली प्रक्रियेची सुरुवात केली.
जाधव यांच्या बदलीनंतर सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारत अंतिम बदली आदेश काढले.
तरीही काही कर्मचारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या मर्जीने जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु होती.
आयजींचा थेट जाब
२१ ऑगस्ट २०२५ रोजी कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी, “बदलीचे आदेश काढल्यानंतरही कर्मचारी जुन्याच ठिकाणी का?” असा कठोर जाब अधिकाऱ्यांना विचारला. तसेच “बदली झालेल्या सर्वांना तात्काळ सोडा” असा स्पष्ट निर्देशही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनि लोकमदत न्यूज च्या प्रतिनिधींना सांगितले होते.
‘लेडी सिंघम’ची तातडीची कारवाई
जिल्ह्यात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभारी पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांनी आयजींच्या निर्देशांनंतर विलंब न लावता आदेश काढत २४ तासांच्या मुदतीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ बदली ठिकाणी रुजू होण्यास सांगितले. “गरज भासल्यास कामासाठी बोलवू शकता; पण बदलीचे आदेश तात्काळ पाळणे बंधनकारक,” असा संदेशही संबंधित विभागांना देण्यात आला असल्याची माहिती मिळते.
अंमलबजावणीची स्थिती
आदेशानंतर थांबवलेले कर्मचारी सोडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू.
अनेक कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सुरुवात केली.
बदली आदेश पूर्ण क्षमतेने राबवले जातील अशी अंतर्गत हालचाल.
लोकमदत न्यूजचा प्रभाव
लोकमदत न्यूजने सत्याला वाचा फोडताच चोवीस तासांच्या आत यंत्रणा हलली—हा जनतेसमोरील उत्तरदायित्वाचा विजय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनातील विलंबाला आळा बसवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची पायरी मानली जाते.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक – अमजद सय्यद 8390088786












