• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री.!

lokmadat news by lokmadat news
September 27, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
73
VIEWS

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावली मातोश्री
पाच दिवसांपासून सुरवसे करतात जीवनावश्यक किटचे वाटप

धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) – सध्या जिल्हाभरात अतिवृष्टी व ढग फुटी सदृश्य पाऊस होत आहे. त्यामुळे परांडा व भूम तसेच इतर भागात नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घराला पुराच्या पाण्याने घेरले आहे. तर या पाण्याने चौघाजणांना आपल्या कवेत घेतले आहे. तसेच पुरात अनेकांचे संसार वाहून तर गेले आहेत त्याबरोबरच शेकडो जनावरे देखील वाहून गेली व काही दावणीलाच मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे पुराच्या तडाख्याने हाहाकार माजलेला आहे. अनेकांना खाण्यास अन्नाचा कण देखील शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे अशा संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट तसेच रोख रक्कम आणि कपडे आदी साहित्य पुरविण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य मातोश्री हॉटेलच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून सुरू केलेले आहे. आजचा त्यांचा पाचवा दिवस असून त्यांनी आतापर्यंत १२०० किटचे वाटप केलेले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीला मातोश्रीचा घास आणि संकटाच्या काळात मायेची उब, आधाराचा व प्रेमाचा घास भरविणारा ठरला आणि ठरत आहे.
धाराशिव जिल्ह्यात दि.१९ सप्टेंबरपासून सलग अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२० छोटे-मोठे धरण आणि तलाव तुडुंब भरले. तर तेरणा, सिना, मांजरा, चांदणी, उल्फा, बाणगंगा, रामगंगा आदी नद्या तुडूंग भरून राहिल्या. या नद्यात वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या नद्यांनी आपली पातळी ओलांडत कडेवर असलेल्या गावात आपला विस्तीर्ण मोर्चा ओळविला. त्यामुळे या काठालगत असलेल्या गावात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर घरामध्ये असलेले सर्व साहित्य पाण्याबरोबर वाहून गेले असून जे आहे ते भिजून सडलेले आहे. अद्यापही काही घरांमध्ये कमरे इतके पाणी असून या नागरिकांना घरात प्रवेश देखील करता आलेला नाही. तर ज्या घरातील पाणी ओसरलेले आहे. त्या घरात गुडघ्या इतका चिखलाचा खच व सडा पडलेला आहे. विशेष म्हणजे या पुराच्या पाण्याबरोबर साप, अजगर आणि विंचू घरात शिरलेले आहेत. त्यापैकी एकाला सापाने दौश केल्याने त्या व्यक्तीचा जागीच तर पडून मृत्यू झाला. तसेच शेती व शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, मका आणि ऊस आदींसह इतर पिकांची अतोनात हानी झाली आहे. शेतात तर कमरे एवढे खड्डे पडलेले असून पिके मातीसह वाहून गेलेली आहेत. अशा संकटाच्या काळात या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी जी शक्य होईल त्या मदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. याची जाण असलेल्या धाराशिव शहरातील मातोश्री हॉटेलचे मालक मनोज सुरवसे हे दि.२३ सप्टेंबरपासून परंडा, भूम, कळंब आणि धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांसह संकटग्रस्त आणि निराधार कुटुंबांना ५ किलो गव्हाचे पीठ, शेंगदाणे, साखर, चहा पावडर, खाद्यतेल, खोबरेल तेल, बेसन, रवा, मैदा, निरमा, मोहरी, चुरमुरे, फरसाण, तूर डाळ, मूग डाळ, शाबूदाणा, अंगाचा आणि कपड्याचा साबण, टूथपेस्ट आदींसह शतरंजी, ब्लॅंकेट व चादर जीवनावश्यक वस्तूंचे किट असलेले साहित्य त्यांनी चार चाकी गाड्यांमध्ये पूरग्रस्त भागात जाऊन दररोज गरजवंत असलेल्या व्यक्तींना स्वतः वितरण करीत आहेत. त्यांनी सिरसाव, पाथरुड, चिंचपूर, बेलगाव, पिंपळगाव, अंतरगाव, विडा, लाखी, नालगाव, वडनेर, देवगाव (खुर्द), वांगे गव्हाण, म्हात्रेवाडी, गोगलगाव, कारंजा, पिंपरी, ढग पिंपरी, लोहारा आदींसह इतर गावात त्यांनी १२०० किटचे वितरण संकटग्रस्तांना वाटप करुन त्यांना घास भरविण्याबरोबरच मायेची ऊब देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे. मनोज सुरवसे यांनी खरा मातोश्रीचा आधार काय असतो ? हे प्रत्यक्षात कृतीद्वारे दाखवून दिलेले आहे. त्यामुळे इतरांनी अशा आसमानी संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.


सुरवसे यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या आवाहनास अनेकांचा प्रतिसाद मिळत असून अहिल्यानगर येथील आष्टी येथील दानशूर उद्या दि.२९ सप्टेंबर रोजी जीवनावश्यक वस्तूंचे किट घेऊन येणार आहेत. तर इतर देखील मदत गोळा करण्याच्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळे अनेक दानशूर यांनी अशा संकट समयी आपल्या स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबावर आलेले संकट असल्याचे समजून मदतीसाठी पुढे येणे गरजेचे बनले आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorअतिवृष्टी अनुदान मदतकार्यआपत्ती व्यवस्थापनआमदार कैलास पाटीलखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतमहाराष्ट्र ग्रामीण विकासमातोश्री
SendShareTweet
Previous Post

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत…

Next Post

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर महिला शिपायाचे गंभीर आरोप – गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर महिला शिपायाचे गंभीर आरोप – गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT