• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

lokmadat news by lokmadat news
August 16, 2025
in कृषी
0
0
SHARES
18
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत तर काही ठिकाणी शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. प्रशासनाला या सगळ्या बाबींचे तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या असून पंचनामे सुरु देखील करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनीही आपापल्या परिसरात झालेल्या नुकसानीची तक्रार संबंधित तलाठ्यांकडे तातडीने दाखल करावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

कळंब तालुक्यातील खोंदला गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आपल्या एका सहकाऱ्याच्या अद्यापही शोध सुरूच आहे. दुर्दैवाने या शोधकार्यात अद्यापपर्यंत आपल्याला यश आलेले नाही. तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे. मांजरा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. मांजरा धरणात देखील मोठ्या वेगाने पाणी दाखल होत असल्याने लवकरच मांजरा धरणही शंभर टक्के भरेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाला आहे. कळंब आणि परिसरातील पावसाची आकडेवारी अभूतपूर्व आहे. इटकूर परिसरात मागील चाळीस वर्षांत असा पाऊस झाला नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. इटकूर गावातील पुलावर जवळपास ५ तास दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली असल्याचे दिसत आहे. नदीकाठी असलेल्या शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सर्व तहसीलदार आणि तलाठ्यांसोबत तातडीने संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात देखील झाली आहे. शेतकरी बांधवांनीही तलाठ्यांकडे तातडीने नुकसानीच्या तक्रारी सादर कराव्यात कराव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

अनेक भागात जनावरे दगावली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती आणि जनावरे दगावली असल्यास याबाबतही तातडीने तक्रारी सादर कराव्यात. पुढील दोन- तीन दिवस आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे पुढील पाऊस जास्त नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणा नंतर कुठल्याही प्रशासकीय बैठकीला हजेरी न लावता तातडीने बांधावर जाऊन उद्भवलेल्या पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी केली. सगळी माहिती जाणून घेतली. प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Tags: अतिवृष्टीअनुदान मदतकार्य dharashiw osmanabad कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आ. राणाजगजितसिंह पाटीलकळंबकृषी विभागखोंदला
SendShareTweet
Previous Post

महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा सत्यजीतराजे कात्रे महाराष्ट्रात ४ था

Next Post

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद…तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

Related Posts

कृषी

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

January 11, 2026
कृषी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये  शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा

January 2, 2026
कृषी

हातलाई शुगरच्या  गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन

November 19, 2025
कृषी

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

October 24, 2025
कृषी

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत…एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

October 20, 2025
कृषी

अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना नुकसानभरपाई द्यावी – आ. कैलास पाटलांची मागणी

October 18, 2025
Next Post

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद...तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

January 16, 2026

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

January 15, 2026

अंबेहोळमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का विद्यमान उपसरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

January 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT