धाराशिव प्रभाग १४ व १५ मध्ये भाजपच्या प्रचारफेरीला जनतेचा प्रचंड उत्साह
विजयाची चाहूल स्पष्ट – मल्हार पाटील
धाराशिव, दि. 28 (प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मधील भीमनगर परिसरात भाजपतर्फे काढण्यात आलेल्या भव्य प्रचारफेरीला नागरिकांचा प्रचंड, उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण प्रतिसाद लाभला.युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच
प्रभाग क्र.14 मधील भाजप–आरपीआय महायुतीचे उमेदवार सौ. अस्मिताताई उदय बनसोडे आणि संग्राम बनसोडे तसेच प्रभाग क्र.15 चे उमेदवार नरेन वाघमारे व सौ. सरोजा दत्ता पेठे यांच्या समर्थनार्थ या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी आणि उत्साही समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत “विकासाचा निर्धार – भाजप सरकार’’च्या घोषणा दिल्या.
या अभूतपूर्व प्रतिसादाबाबत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, “धाराशिव बदलाच्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. नागरिकांचा उत्साह पाहता विजयाची चाहूल आता अधिक स्पष्ट झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, धाराशिवचा सर्वांगीण विकास, सुरक्षित भविष्य, सुशासन आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम पर्याय आहे. या महाप्रचाराने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांचा उमेदवारांवरील प्रचंड विश्वास आणि उत्साही गर्दी पाहता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विजय अनिवार्य असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती.
या प्रचारफेरीत दत्ता पेठे, विद्यानंद बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, मुन्ना ओव्हाळ, सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, प्रशांत माळाले यांच्यासह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेवटी, नागरिकांना प्रगतीचा मार्ग निवडण्याचे आवाहन करताना युवा नेते मल्हार पाटील म्हणाले—
“धाराशिवच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासाच्या वाटचालीसाठी… कमळ चिन्हावर बटण दाबा आणि भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करा.”
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













